Posts

तरुणाई भरकटते आहे…

तरुणाई भरकटते आहे…एक चिंताजनक वास्तव        आजची तरुणाई ही देशाची ऊर्जा, क्षमता आणि उद्याचे नेतृत्व आहे. प्रत्येक पिढीत तरुणांकडून समाजाला बदलण्याची, नवी दिशा देण्याची अपेक्षा असते. परंतु आजच्या गतिमान, डिजिटल आणि स्पर्धात्मक युगात तरुण पिढी अनेक दिशांनी भ्रमित होताना दिसते. “तरुणाई भरकटते आहे” हे वाक्य केवळ तक्रार किंवा आरोप नाही, तर एक सामाजिक वेदना आणि पालक-शिक्षकांची चिंता आहे. या भरकटण्यामागील कारणे समजून घेणे आणि योग्य उपाययोजना करणे हे काळाचे गरज बनले आहे. १. भरकटण्याची कारणे (अ) सोशल मीडियाचे व्यसन मोबाईल आणि सोशल मीडिया हे तरुणांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहेत. माहितीपेक्षा अधिक प्रमाणात गैरमाहिती, नकारात्मकता, तुलना आणि आभासी जगातील आकर्षणे तरुणांना वास्तविकतेपासून दूर नेत आहेत. Likes, followers, reels यांची धुंदी इतकी वाढली आहे की अनेकजण स्वतःची ओळखच डिजिटल प्रतिमेशी जोडू लागले आहेत. (आ) चुकीचे आदर्श आणि ग्लॅमरचे आकर्षण फिल्मी हिरो, इन्फ्लुएन्सर्स, रिअॅलिटी शो कलाकार—हेच नवे “आदर्श” झाले आहेत. कठोर परिश्रम, शिस्त, संघर्ष यांचे महत्त्व कमी हो...

आयुष्य संपवण्याचे विचार मनात कसे येतात आणि ते कसे रोखावेत?

          आत्महत्या हा अनेक दशके आपल्या समाजात दुर्लक्षलेला विषय राहिला आहे. सुशांत सिंग राजपूत, जिया खान, भय्यूजी महाराज अशा व्यक्तींच्या आत्महत्येनंतर गेल्या काही वर्षांमध्ये समाजात त्या विषयी थोडी चर्चा होऊ लागली आहे. कोविड-19 नंतर वाढलेल्या ताणतणावांच्या पार्श्वभूमीवर वाढत्या आत्महत्या हा एक गंभीर सार्वजनिक प्रश्न म्हणून समोर येऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर आपण हे समजून घेतले पाहिजे की, गेली काही वर्षे जशी एखादी संसर्गजन्य आजाराची साथ पसरावी, त्याप्रमाणे आत्महत्यांची एक सुप्तसाथ आज आपल्या देशात पसरली आहे.       भारतात दरवर्षी दोन लाखांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू आत्महत्या केल्याने होतो. त्यामधील निम्म्या म्हणजे साधारण एक लाख आत्महत्या या 15 ते 35 या वयोगटातील म्हणजे तरुणाईच्या असतात. आपण थोडे हळहळतो आणि काही दिवसांनी हे विसरून जातो. पण हा विषय खूप गंभिर आहे.       'युवाल नोवा हरारी' हा आजच्या जगातील एक महत्वाचा भाष्यकार असे म्हणतो की, ‘’युद्ध आणि दहशतवाद ह्यापेक्षा 'आत्महत्या’ हा आजच्या जगासाठी खूप अधिक महत्वाचा प्...

परीक्षेची अवास्तव भीती (एक्झाम फोबिया)

खरंतर परीक्षेची भीती कमी-जास्त प्रमाणात आपल्यातल्या प्रत्येकालाच वाटते. काहीजण या भीतीपोटी जास्त अभ्यास करतात, तर काही जणांची ही भीती इतकी अवास्तव बनते की, परीक्षेच्या आधीपासूनच त्यांना धडधडायला लागते.  पोट बिघडते, झोप उडते, अभ्यासात लक्ष लागत नाही आणि प्रत्यक्ष परीक्षा देताना हातात प्रश्नपत्रिका आली, की एकदम बधिर व्हायला होते. एकही प्रश्न ओळखीचा वाटत नाही, बघता बघता प्रश्नपत्रिकेवरची अक्षरे ‘गायब’ होऊ लागतात! मुले एकदम ‘ब्लँक’ होतात. यालाच एक्झाम फोबिया (exam phobia) किंवा ‘परीक्षेची अवास्तव भीती’ म्हणतात. परीक्षेच्या भीतीची मेंदूतील केंद्रे :  मेंदूतील चार मुख्य केंद्रांमधून हे कार्य घडते. हायपोथॅलॅमस  : मेंदूच्या मध्यभागातील हे केंद्र भावना समजून त्यांच्या योग्य त्या संवेदना मेंदूला आणि त्याचवेळेस अंतःस्राव निर्माण करणाऱ्या ग्रंथींना पोचवते! ॲमिग्डेला  : हेही मेंदूच्या मध्यभागातील केंद्र भावनिक मेंदू व तार्किक मेंदूच्या मधल्या सेतूचे काम करते. पण हे केंद्र जास्त उत्तेजित झाले, तर तार्किक विचारशक्ती बंद पडते. हिप्पोकॅम्पस  : पहिल्या दोन्ही केंद्रांच्या अगदी जव...

दुर्देव

  हिरो सारखा सुंदर दिसणारा मुलगा जो बेंगलोरच्या नामांकित विद्यापीठात M.Tech चे उच्च शिक्षण घेत होता, अजून चार महिन्यांनी तो मोठ्या नोकरीवर रुजू होणार होता. पुढील वर्षात त्याने परदेशातही नोकरीस जाण्याची तयारी सुरु केली होती. ज्याची आई त्याच्या लग्नाची स्वप्न रंगवत होती. पोरगा हाताखाली आल्याचा बापाला अभिमान वाटत होता. सगळं अतिशय सुखा, समाधानात सुरु होते.  आणि मग अचानक २२ सप्टेंबरच्या रात्री वडिलांना बेंगलोर वरून त्यांच्या मुलाच्या मित्राचा फोन येतो की “तुमच्या मुलाचा अक्सिडेंट झालाय, डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे, तुम्ही तातडीने निघा” अंगावर अचानक वीज कोसळावी अशी ही दुर्देवी बातमी त्या बापाने कशी झेलली असेल ? बापाला बेंगलोरला पोहोचायला दुसऱ्या दिवशीची दुपार होणार होती. एवढ्या लांबच्या प्रवासात त्याची काय मानसिकता असेल. अपघात झाल्यानंतर त्या मुलाच्या मित्रांनी त्याला तातडीने हॉस्पिटलमधे दाखल केले. वडिल प्रवासात असतानाच मित्रांचा दुसरा फोनयेतो की “डॉक्टर म्हणालेत, मेंदूचे ऑपरेशन करावे लागेल, पण ते करूनही पेशंटचा फक्त एक टक्का चान्स असेल जगण्याचा” काय निर्णय घेतला असेल बापाने. दुस...

जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र आयोजित प्रशिक्षण कार्यक्रम

Image
 

तलाठी भरती - अर्ज भरणेची प्रक्रिया सुरू

 सविस्तर माहितीसाठी येथे Click करा. 👉  Open महसुल आणि वन विभाग महाराष्ट्र तलाठी भरती  २०२३ . ⇒  पदाचे  नाव :   तलाठी . ⇒ एकूण  रिक्त  पदे :   4644  पदे . ⇒  नोकरी  ठिकाण :  महाराष्ट्र. ⇒  शैक्षणिक  पात्रता :  कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा ०२) मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. ⇒  वयोमर्यादा :   खुला प्रवर्ग:  18 ते 38 वर्षे,  मागास प्रवर्ग:  18 ते 43 वर्षे. ⇒ वेतन/ मानधन : रु, 25,500/- ते रु. 81,100/-. ⇒ अर्ज करण्याची पद्धत :  ऑनलाइन. ⇒  अर्ज  शुल्क :  खुला प्रवर्ग :  ₹1000/- ,   राखीव प्रवर्ग (मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) :  ₹900/- . ⇒ ऑनलाइन अर्ज सुरू करण्याची तारीख:   26 जून २०२३ . ⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख:   17 जुलै २०२३.

नाहीतर पंचविशीत हार्ट अँटॅक हा ट्रेंड होईल!!

 हजारो ह्रदयविकारी रूग्णांवर शस्त्रक्रिया करून त्यांचे जीव वाचविणार्या ४१ वर्षांच्या डाॅ. गौरव गांधी यांचा ह्रदयविकाराने मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी गुजरातमधील जामनगरात हे घडले.  माझ्याकडे २० ते ३० वर्ष वयाचे तरूण ब्लड प्रेशर घेऊन मोठ्या संख्येने येत आहेत. या वयात रक्त पातळ व्हायच्या गोळ्या चालू करायला लागाव्यात असे का घडत आहे? डाॅ. गौरव गांधी यांना व्यसन नव्हते. रात्री छातीत दुखू लागल्यावर त्यांनी, ईसीजी करून घेतला जो नाॅर्मल आला. पित्त समजून घरी परतल्यावर काही तासानंतर ते बेशुद्ध झाले, व्हेंटिलेटरवर ठेवले. पण उपयोग झाला नाही. पोस्ट माॅर्टेम मध्ये ह्रदयात कोणतेही बदल दिसले नाहीत. कारण लक्षणे उद्भवणे आणि मृत्यू यामधील वेळ अत्यंत कमी असेल तर ह्रदयात खुणा सापडत नाहीत. ७ तासाच्या कालावधीत त्या मिळतात.  ह्रदयविकार झटक्यांच्या ३०% केसेसमध्ये ईसीजी नाॅर्मल येतो. अशावेळी हाॅस्पिटलात पुढे २४ तास रहाणे अनिवार्य ठरते. ईसीजी ठराविक अंतराने करणे आणि रक्तातील ट्रोपोनीन व क्रियाटीनीन व अन्य चाचण्या  तपासाव्या लागतात.  तरूण वयात ह्रदयविकार वाढले आहेत कारण स्ट्रेस वाढलाय. मान...