Posts

Showing posts from April, 2021

भावनांची गडबड

माझ्या ओळखीतले एक नवरा बायको सध्या कोविड पॉझिटिव्ह आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या बिल्डिंग मध्येच दोन-तीन फॅमिलीने एकत्र जमून गेट-टुगेदर केलं आणि नेमकं त्या पार्टीतले काहीजण पॉझिटिव्ह आले. त्यातच हे दोघे सुद्धा होते. सुदैवानी मुलगा मोठा आहे, तो निगेटिव्ह आहे. तसंच दोघांनाही काही त्रास नव्हता.  पंधरा दिवस दोघं घरातच क्वारनटाईन  झाले.  यात त्यांची प्रचंड भांडणं झाली. 'त्या पार्टीला यायचा तू मला आग्रहच का केला? 'असं म्हणून बायको नवऱ्यावर चिडत राहिली. ' आपण कुठून त्या पार्टीला गेलो? ' असे विचार सतत त्या नवऱ्याच्या मनात येत होते आणि त्याला प्रचंड नैराश्य आलं. त्यांच्याशी वेगवेगळं आणि एकत्रितपणे फोनवर बोलताना माझ्या लक्षात आलं राग, अपराधीपणा, नैराश्य, एकटेपणा अशा अनेक नकारात्मक भावनांचा त्यांना त्रास होत होता. दोघं सतत नकारात्मक विचार करत होते. हे स्वाभाविकच आहे. कारण आपल्यावर कुठलंही संकट येतं, समस्या येतात तेव्हा नकारात्मक विचार सुरु होतात. ते बरेचदा प्रश्नार्थक असतात. माझ्याच बाबतीत का? माझं नशीब असं कसं? तू का मला तिकडे नेलंस? मी त्याचं का ऐकलं? मी का त्यावेळी तिकडे गे...

जागतिक पुस्तक दिन विशेष

Image
जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन दरवर्षी २३ एप्रिल रोजी साजरा केला जातो. वर्ल्ड बुक कॅपिटल २०२१ म्हणून तिबिलिसी शहर निवडले गेले आहे.   युनेस्को आणि त्यासंबंधित संस्था जगभरात जागतिक पुस्तक दिन साजरा करतात. लोकांमध्ये वाचनाची सवय वाढवणे आणि जगभरातील लेखक आणि पुस्तकांचा सन्मान करणे हे या दिवसाचे मुख्य उद्दीष्ट आहे.    २३ एप्रिलच का? विल्यम शेक्सपियर, मिगुएल सर्व्हंटिस आणि इंका गार्सिलोसो यांच्यासह जगातील ख्यातनाम व्यक्तींचा या दिवशी मृत्यू झाला. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, युनेस्कोने २३ एप्रिलला जागतिक पुस्तक दिन म्हणून घोषित केले. हा दिवस पहिल्यांदा २३ एप्रिल १९२३ रोजी स्पेनमधील पुस्तक विक्रेत्यांनी साजरा केला. स्पेनमध्ये मिगेल डे सर्व्हांटिसच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर १९९५ मध्ये पॅरिसमध्ये युनेस्कोची सर्वसाधारण सभा झाली, ज्यात जगभरातील लेखकांना आदर आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि पुस्तकांमध्ये रस निर्माण करण्यासाठी जागतिक पुस्तक दिन प्रत्येक वर्षी साजरा केला जाईल असा निर्णय घेण्यात आला. कॉपीराइट म्हणजे काय? कॉपीराइट कायदेशीर सं...

सत्कर्म

 एक राजाला चार राण्या होत्या, पहिली राणी इतकी सुंदर होती! कि तो तिला फक्त प्रेमाने बघत रहायचा? ❕दुसरी राणी इतकी सुंदर होती की, तिला तो सतत जवळ घेऊन बसायचा! ❕तिसरी राणी इतकी सुंदर होती कि, तिला कायम बरोबर घेऊन फिरायचा ? ❕चौथ्या राणीकडे तो कधीच लक्ष द्यायचा नाही !!!! ❕राजा म्हातारा झाला, तो मरणासन्न अवस्थेत असताना त्याने पहिल्या राणीला बोलावले आणी म्हणाला, "मी तुला एवढे प्रेम दिले, तू माझ्याबरोबर येशील का?" ❕राणी म्हणाली मी तुला इथेच सोडुन देणार आहे. ❕राजाला दुखः झाले. मग त्याने दुसऱ्या राणीला तोच प्रश्न विचारला राणी म्हणाली, "मी तुमच्याबरोबर स्मशानापर्यंत येईल त्यापुढे नाही. ❕राजाला अपारं दुखः झालं, त्याने आशेने तिसऱ्या राणीला विचारले, "तू तरी माझ्याबरोबर येशील का नाही ? ❕तिसरी राणी म्हणाली, "मी तुम्ही गेल्याबरोबर दुसऱ्या कुणाबरोबर जाणार आहे, तुमच्याजवळ रहाणार नाही. ❕आता मात्र राजाच्या दुखाःला पारावार राहिला नाही. तो विचार करू लागला. मी या राण्यांवर माझे पुर्ण जीवन घालवले! त्या कधीही माझ्या नव्हत्याच ? ❕माझे जीवन व्यर्थ घालवले, फुकटं वेळ, पैसा, आयुष्य खर्च केले?...

योगशास्त्र मेडिटेशन

तुमच्यासोबत असं कधी झालयं, की तीव्रपणे एखाद्याची आठवण काढावी आणि तो समोर प्रत्यक्ष हजर… किंवा बोलता बोलता एखादी कल्पना डोक्यात यावी, आणि न सांगताच ती अगदी तशीच्या तशी समोरच्याला एकदम सुचावी.. कधी नुसताचं एखाद्या गोष्टीचा सतत विचार करावा आणि कालांतराने अशक्य वाटणारी ती घटना प्रत्यक्षात यावी, मग राहुन राहुन त्याबद्दल आश्चर्य वाटतं. असं का होतं माहितीय. आपलं डोकं एका रेडिओ सारखं आहे, ते नेहमी संदेशांचं आणि सिग्नलचं आदानप्रदान करत असतं, म्हणुन कधी आपलं मन एकदम आनंदी, प्रफुल्ल्लीत असतं, तरी कधी चिडचिड व्हायला लागते, आणि आपण उदास होतो. जर तुम्हाला नेहमीच आनंदी राहावं असं वाटत असेल तर हे वाचाच. मनाचे दोन भाग आहेत, चेतन मन (जागं असलेलं मन) आणि अवचेतन मन (सुप्त मन). तसचं प्रत्येक मानवी मनाच्या चार अवस्था, म्हणजे चार फ्रिक्वेन्सी आहेत.  बीटा अवस्था – हे आहे आपले चेतन मन, म्हणजे आपली म्हणजे सकाळी उठल्यापासुन रात्री झोपण्यापर्यंत ची जागृत अवस्था. ह्याची फ्रिक्वेन्सी आहे – १४ ते ३० हर्ट्झ. अल्फा स्टेट – ह्यात चेतन मन आणि अवचेतन मन दोघेही झोपलेले असतात. ह्याला ध्यान अवस्था किंवा मेडिटेशन स्टेट अ...

प्रेरणादायी विचार

 डॉ. कलाम यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात १० नियम सांगितले जे कोणत्याही शाळेत शिकविले गेले पाहिजेत.* --------------------------------------------- 👍 नियम १ – आयुष्य खडतर आहे, त्याची सवय करुन घ्या. 👍 नियम २ – जग कधीच तुमच्या स्वाभिमानाची पर्वा करत नाही. स्वत:बद्दल अभिमान बाळगण्याआधी काहीतरी करुन दाखवा. स्वतःला सिध्द करा. 👍 नियम ३ – कॉलेजमधुन बाहेर पडल्या पडल्या पाच आकडी पगाराची अपेक्षा करु नका. एका रात्रीत कोणी वाइस प्रेसिडंट होत नाही, त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी अपार कष्ट करावे लागतात . 👍 नियम ४ – आज कदाचीत तुम्हाला तुमचे शिक्षक कडक आणि भितीदायक वाटत असतील, कारण अजुन बॉस नावाचा प्राणी तुमच्या आयुष्यात यायचाय. 👍 नियम ५ – तुम्ही केलेली चुक ही सर्वस्वी तुमची चुक आहे आणि तुमचा पराजय हा सर्वस्वी तुमचा पराजय आहे. कोणाला दोष देऊ नका, झालेल्या चुकीपासुन धडा घ्या आणि पुढे चालत रहा. 👍 नियम ६ – तुमचे पालक तुम्ही जन्माला यायच्या आधी एवढे कंटाळवाणे आणि अरसिक नव्हते जेवढे तुम्हाला ते आता वाटतात. तुमचेच संगोपन करण्याठी त्यांनी जे अमाप कष्ट घेतलेत त्यामुळेच आज त्यांचा स्वभाव असा झाला आह...

विचारधारा

Image
 

तर प्रत्येकाला कोरोना असेल !

         अमेरिकेत एका कैद्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली तेव्हा तेथील काही शास्त्रज्ञांना वाटले की या कैद्यावर एक प्रयोग करून पहावा. प्रयोगाचा भाग म्हणून त्या कैद्याला फाशी देण्याऐवजी विषारी कोब्रा सापाचा चावा देऊन मारणार असल्याचे सांगण्यात आले. फाशीच्या दिवशी, त्याच्या समोर एक मोठा विषारी साप आणला गेला. त्या कैद्याला खुर्चीवर बसवून त्याचे डोळे बांधण्यात आले. त्यानंतर त्याला सापाचा दंश झाल्याचे भासवण्यात आले परंतु प्रत्यक्षात मात्र त्याला सेफ्टी पीन टोचवण्यात आली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, सापाचा दंश न होतादेखील 2 सेकंदातच त्या कैद्याचा मृत्यू झाला.  कैद्याच्या शरीराचे शवविच्छेदन करण्यात आले. त्या अहवालात कैद्याच्या शरीरात 'व्हेनम' सदृश्य विष सापडले. या विषामुळे त्या कैद्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. आता हे विष त्याच्या शरीरात कुठून आले, ज्यामुळे कैदी मरण पावला? याचे उत्तर असे की, हे विष त्या कैद्याच्या शरीरात मानसिक भीतीमुळे त्याच्याच शरीराने निर्माण केले होते.      याचा अर्थ असा आहे की, आपल्या शरीरात स्वतःच्या मानसिक स्थितीनुसार सका...

समाधान हेच सर्वोत्तम ध्येय

        आयुष्यात तुम्हाला काय हवे आहे? हा प्रश्न बऱ्याच जणांना विचारल्यावर आपल्याला उत्तरे मिळतात की, मला सुखी व्हायचंय, यश मिळवायचं आहे. मुलांबाबतच्या ईच्छा विचारल्या असता बहुतांशी हेच उत्तर मिळते. आयुष्यात जोपर्यंत आपल्या बाबतीत चांगले घडत असते तोपर्यंत आपल्याला ते हवे असते. परंतु दुःख देणारी परिस्थिती निर्माण झाली की मानसिक संघर्ष अनुभवावा लागतो. पूर्ण जीवनकालामध्ये अनेक प्रसंग येतात मग ती सुखकारक असोत अथवा दुःखदायक असोत. येणाऱ्या प्रत्येक घटना, प्रसंगाकडे आपण कशा  पद्धतीने पाहतो यावर तर समाधान अवलंबून असत. चांगलं जीवन जगण्यासाठी चांगले विचार, योग्य संधी निर्माण करणं, निकोप नातेसंबंध इ. बाबींची आवश्यकता असते.          'सुख पाहता जवापाडे, दुःख पर्वताएवढे' या उक्तीप्रमाणे सुखाची मात्रा कमी मानली जाते. याचे कारण म्हणजे सुख शोधण्याऐवजी दुःखाचाच आपण जास्त बाऊ करतो. सुख हे मृगजळासारखे असते. त्याच्या पाठीमागे आपण जितके लागू तितके ते आभासी वाटते. इंद्रधनुष्याच्या एका बाजूला सुख तर दुसऱ्या बाजूला दुःख असते. एका बाजूला सुख आणि  दुसऱ्या बाज...

नैराश्याच्या गर्तेत अडकलेली तरुणाई

   देशाची आर्थिक परिस्थिती आणि कोरोना महामारीमुळे आलेल्या मंदीचा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय पातळीवर मोठा विपरीत परिणाम झाला. लोकशाही व्यवस्थेमध्ये लोकांनी जनहितासाठी निवडणूक दिलेले लोकप्रतिनिधी जगाच्या बाजाराशी आणि देशांतर्गत व्यवस्था मजबूत करण्याचे काम करत असतात. लोककल्याणकारी राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न नेहरूंपासून अगदी राजीव गांधीपर्यंत झाला. मोठमोठे उद्योग, कारखाने, सहकारी संस्था याच काळात उभ्या राहिल्या. १९९१ ला भारताने खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाचे धोरण स्विकारले. देश जागतिक भांडवलदारांच्या दावणीला उभा केला. त्याचा शेती, उद्योग, सहकारी उद्योग, कारखाने यांच्यावर मोठा विपरीत परिणाम झाला. खाजगीकरणाने वेग घेतला आणि सार्वजनिक व्यवस्थेतून सरकारने काढता पाय घेण्यास सुरुवात केली. शिक्षण, आरोग्य इ. या सेवा न राहता, त्या नफा कमवणारी आणि मिळवून देणारी केंद्र बनली. रोजगाराचा प्रश्न कायमस्वरुपी वरुन कंत्राटी, अंशकालीन अशा अनेक प्रकारे होऊ लागली. कमी पगारावर राबवून घेणारी व्यवस्था मुळ धरत होती. आता तिनं आपलं वटवृक्ष उभं केलंय. कंत्राटी पध्दतीने आता शासन व्यवस्थेत ही शिरकाव क...

विचारधारा

  भगवान गौतम बुद्धांचे अनमोल विचार – “आपल्या विचारांवर आपण अवघे जग निर्माण करू शकतो.” “स्वतःच्या क्षमतेवर कोणतेही कार्य करा,  दुसऱ्यावर अवलंबून राहू नका.” “मी काय केले कधीच पाहत नाही,  मी पाहतो कि मी काय करू शकतो.” “अर्थहीन वाद-विवादापेक्षा अर्थपूर्ण शांतता नेहमीच श्रेष्ठ असते.” “तुमच्या रागामुळे तुम्हाला शिक्षा होणार नाही,  तुमच्या रागाने तुम्हाला शिक्षा होईल.” “जगात तीन गोष्टी कधीही लपवल्या जात नाही,  सूर्य,  चंद्र आणि सत्य.” “शांतता नेहमी मनातूनच येत असते,  त्याचा कुठेही बाहेर शोध घ्यायला गेलात तर ती मिळणार नाही” “भूतकाळावर लक्ष न देता भविष्याविषयी विचार करा,  आणि स्वतःच्या मनाला वर्तमानात” “संयम हा खूप कडवट असतो,   पण त्याच फळ खूप गोड असतं.” “खऱ्या अर्थाने स्वतःवर प्रेम करणारी व्यक्ती कधीच कोणालाही दुखवू शकत नाही.“ “मन सर्वकाही आहे,  तुम्ही जे विचार करता ते तुम्ही बनता.” “तुमचा शत्रू जितकी इजा करत नाही,  त्यापेक्षा जास्त इजा नकारात्मक विचार करतात. .” “सुख मिळवायचा असा कोणताच रस्ता नाही आहे,  त्यापेक्षा  खुश राहणे ...