Posts

Showing posts from November, 2021

मॅनेज युअर अँगर (राग व्यवस्थापन)

Image
राग ही खूप प्रखर; पण सामान्य भावना आहे. रागाची तीव्रता व्यक्तीपरत्वे बदलत असते. रागाची तीव्रता खूप वाढली, तर रागाचे रूपांतर संताप आणि हिंसेमध्ये होऊ शकते. ही गोष्ट राग येणाऱ्या आणि राग आलेल्या व्यक्तींच्या सान्निध्यात असलेल्या व्यक्तींसाठी घातक ठरू शकते. त्यामुळे रागाचे योग्य वेळी, योग्य रितीने व्यवस्थापन करता येणे ही एक कौशल्याची गोष्ट आहे. आजच्या गतिमान जीवनशैलीत ताण, वैफल्य, भिती, असुरक्षिततेची जाणीव, दहशत, अपेक्षाभंग इत्यादी गोष्टींचे प्रमाण वाढलेले आहे. याचा परिणाम 'राग' या सर्वात जास्त नकारात्मक असलेल्या भावनेच्या प्रदर्शनातून व्यक्त होत असतो. यामुळे मोठ्या प्रमाणावर 'राग' ही भावना जन्माला येते. विविध वयांतील अनेक माणसे रागावर नियंत्रण कसे करावे, याची विचारणा करत असतात. यावरूनच ही भावना खूप प्रखर असल्याचे लक्षात येते. म्हणूनच योग्य वेळी, योग्य रितीने रागाचे व्यवस्थापन करता येणे ही एक कौशल्याची गोष्ट म्हणून आत्मसात करण्यास काहीच हरकत नाही. त्याची सुरुवात आपण प्रथम रागाची कारणे शोधून करूया. ही कारणे पुढील प्रमाणे विभागू शकतो. * रागास जबाबदार व्यक्तींमधील अंतर्गत घ...

मेड फॉर इच अदर

 कागदावर जुळलेली पत्रिका आणि  काळजावर जुळलेली पत्रिका यात अंतर राहतं. लाखो मनांच्या समुद्रातून योगायोगाने २ मनं अगदी एकमेकांसारखी समोर ठाकणं जवळ-जवळ अशक्य आहे, हे मानूनच हा डाव मांडायचा असतो. वेगळ्या वातावरणात, संपूर्ण निराळे संस्कार लाभलेले २ जीव, एकमेकांसारखे असतीलच कसे? सुख-दुःख, प्रेम, भांडणाचे काळे पांढरे चौकोन ओलांडण्याचा खेळ खेळवणं हीच तर नियतीची जुनी हौस आहे. सरळ सोपं आयुष्य नियतीने देवालाही दिलेले नाही. या न देण्याचंच 'देणं' स्वीकारून संसारात पाऊल टाकायचं असतं. निसर्गात एक पान दुसऱ्या पानासारखं नाही, तर तुला मिळणारा 'जीवन साथीदार' अगदी तुला हवा तसा असणार कसा? त्याचे - आपले, काही गुण जुळणारे नसणारच..त्या वेगळ्या आपल्याला न पटणाऱ्या गुणांतच, त्याचं माणूस म्हणून वेगळेपण आहे, हे मान्य करणार असाल तरच संसारात पाऊल टाकावं. अशा आशयाचं समुपदेशन ही आज काळाची गरज आहे. कागदावरच्या कितीही कुंडल्या बघा.. बघण्याच्या समारंभात गच्चीवर गप्पा मारताना छंद, महत्त्वाकांक्षा, श्रद्धा-अंधश्रद्धा असे तेलकट प्रश्न विचारा.. या प्रश्नांची उत्तर ही सौंदर्य-स्पर्धेतील मेकअप केलेल्या सुंदर म...

स्वतःला वचन द्या

मित्र/मैत्रिणींनो आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो. आनंदी आणि समाधानी राहणं आपल्याच हाती असत, परंतु आपण मात्र परिस्थितीला दोष देत बसतो. चला तर जाणून घेऊयात स्वतः अंगिकारता येतील असे काही मूलमंत्र.... ════════════════════ 🌿 एवढं मजबूत मन बनवायचं आहे की कोणतीही घटना, परिस्थिती तुमच्या मानसिक शांतीला ढळू देणार नाही. 🌿 मी ज्या ज्या व्यक्तींना भेटणार त्यांच्याशी आरोग्य, आनंद, समृद्धी बद्दल नक्की बोलणार. 🌿 माझ्या मित्र/मैत्रिणींशी अशाप्रकारे बोलणार की त्यांना जाणवून देईल की त्यांच्यात ही काहीतरी चांगलं आहे. 🌿 आपल्या आयुष्यातील आधीपासून चांगल्या असणाऱ्या गोष्टींबद्दल रोज सकाळी आणि रात्री कृतज्ञता व्यक्त करणार. उदा. माझ्यावर प्रेम करणारे आई वडील, मित्रमंडळी आहेत, माझं आरोग्य चांगले आहे, मी माझे ध्येय प्राप्त करण्याकरिता योग्य प्रयत्न करत आहे त्याबद्दलमी आभारी आहे. हे लिहत चला वही मध्ये रोज किंवा मनात म्हणू शकतात तुम्ही ज्या गोष्टींबद्दल कृतज्ञ आहात त्याबद्दल. 🌿 विचार करायचा झाला तर तो चांगलाच करणार, आणि चांगल्यासाठीच करणार, त्यातून चांगलं काहीतरी घडणार आहे म्हणून करणार. 🌿 इतरांच्या यशाब...