*रफू...* एक मित्र भेटला परवा... खूप जुना... बऱ्याच वर्षांपूर्वी भांडण झालं होतं आमचं... नेमकं कारणही आठवत नव्हतं मला, इतक्या वर्षांनंतर... म्हणाला, _"मुद्दामहून भेटायला आलोय तुला... हा योगायोग नाही... क्षुल्लक कारणांमुळे नाती तुटलेल्या सगळ्यांना भेटायचं ठरवलंय."_ सुरुवात माझ्यापासूनच होती. कारण, सगळ्यात जास्त किरकोळ कारणावरुन... सर्वात अधिक घट्ट नातं तुटलेल्यांत मी अग्रस्थानी होतो... अचानकच समोर आल्याने मला माझा अहंकार काही पुरता बाजुला सारता आला नाही... तेव्हढा वेळच नाही मिळाला. विचारलं मी त्याला अचानक ऊपरती होण्यामागचं कारण... चेहऱ्यावर शक्य तेव्हढा _'आलासच ना अखेरीस'_ हा माज ठेऊन. तो मला म्हणाला, _"दोन महिन्यांपूर्वी मला माझी चूक कळली..._ _काॅलेजमध्ये थर्ड ईयरला असताना तू एकदा रफू केलेली पॅन्ट घालून आला होतास..._ _ते कोणाला कळू नये म्हणून केलेल्या अवाजवी प्रयत्नात, नेमकं ते माझ्याच लक्षात आलं..._ _आणि मग मी त्याचा बाजार मांडायला अजिबात वेळ दवडला नव्हता..._ _वर्गात सगळ्यांना सांगून, सगळे तुझ्याकडे अगदी बघून बघू...
आत्महत्या हा अनेक दशके आपल्या समाजात दुर्लक्षलेला विषय राहिला आहे. सुशांत सिंग राजपूत, जिया खान, भय्यूजी महाराज अशा व्यक्तींच्या आत्महत्येनंतर गेल्या काही वर्षांमध्ये समाजात त्या विषयी थोडी चर्चा होऊ लागली आहे. कोविड-19 नंतर वाढलेल्या ताणतणावांच्या पार्श्वभूमीवर वाढत्या आत्महत्या हा एक गंभीर सार्वजनिक प्रश्न म्हणून समोर येऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर आपण हे समजून घेतले पाहिजे की, गेली काही वर्षे जशी एखादी संसर्गजन्य आजाराची साथ पसरावी, त्याप्रमाणे आत्महत्यांची एक सुप्तसाथ आज आपल्या देशात पसरली आहे. भारतात दरवर्षी दोन लाखांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू आत्महत्या केल्याने होतो. त्यामधील निम्म्या म्हणजे साधारण एक लाख आत्महत्या या 15 ते 35 या वयोगटातील म्हणजे तरुणाईच्या असतात. आपण थोडे हळहळतो आणि काही दिवसांनी हे विसरून जातो. पण हा विषय खूप गंभिर आहे. 'युवाल नोवा हरारी' हा आजच्या जगातील एक महत्वाचा भाष्यकार असे म्हणतो की, ‘’युद्ध आणि दहशतवाद ह्यापेक्षा 'आत्महत्या’ हा आजच्या जगासाठी खूप अधिक महत्वाचा प्...
सिंहावलोकन हा शब्द दोन शब्दांना जोडून तयार होतो. एक म्हणजे सिंह आणि दुसरा म्हणजे अवलोकन. अवलोकन करणे म्हणजे पाठीमागे झालेल्या गोष्टींचा पाठपुरावा करणे व झालेल्या गोष्टींकडे मागे वळून पाहणे. सिंहावलोकन म्हणजे सिंहाप्रमाणे मागे पाहून मागच्या कारकीर्दीवर नजर टाकणे. आपल्या आयुष्यात आपण सुद्धा एका निरंतर वाहणाऱ्या नदी सारखे वाहतो. अडथळे येतात, संकटे येतात कधी आपणच अडचणींचे लक्ष ठरतो. पण आयुष्यात पुढे चालायचे असेल तर हे सिंहावलोकन करता आले पाहिजे. ते करताना बरेचदा न पाहलेल्या, न जाणवलेल्या किंवा न समजलेल्या गोष्टी, त्यांची खोली किंवा त्याचा न कळलेला अर्थ नव्याने समजू लागतो. आपल्याला जाणवणाऱ्या मागच्या प्रवासातील गोष्टी कधी गर्द आणि अनाकलनीय वाटू लागतात, वेळेनुसार एका अशांत सागरा समान गलबल उठवतात, अस्थिर झालेल्या मनाला निराशा आणि नकारात्मक दिशेला घेऊन जातात पण खरं सांगायचं तर हीच ती वेळ असते स्वतःला स्वतःची सोबत करण्याची. आपण रोज आरशात पाहतो, सजतो आणि सजवतो पण तेव्हा बाह्य रंगोटी मधून जेवढा आनंद मिळत नाही जेवढा हा सिंहावलोकन करताना मिळतो. आपल्यातले एक एक कंगोरे आणि स्वतःला शोधण्याचा निखळ आनंद...
Comments
Post a Comment