समाजात वावरताना या गोष्टी आचरणात आणा

 आवर्जून आणि शांत पणे वाचावी अशी  post .व्यक्तिमत्व विकासासाठी समाजात वावरताना या गोष्टी आचरणात आणा:--*


*1. एखादी व्यक्ती आपला फोन उचलत नसेल तर त्या व्यक्तीला दोन वेळेच्या वरती परत परत फोन करू नका , कदाचित त्या व्यक्तीला त्यावेळेस तुमच्या फोनपेक्षा महत्त्वाचे काम असेल.*


*2. तुम्ही एखाद्याकडून उधार घेतलेले पैसे त्याने परत मागण्याअगोदर परत करा , तीच गोष्ट छत्री आणि पेनबाबत...*


*3. एखादा तुम्हाला हॉटेलमध्ये जेवायला नेतो तेव्हा मेनूतील महागडा पदार्थ ऑर्डर करू नका , शक्य असल्यास पार्टी देणाऱ्यालाच ऑर्डर करायला सांगा.*


*4. तुझ अजून लग्न झालं नाही ? तू अजून घर बांधलं नाहीस ? असले समोरच्याला अडचणीत टाकणारे प्रश्न विचारू नका , कारण ती तुमची अडचण नाही.*


*5. नेहमी आपल्यापाठुन येणाऱ्या व्यक्तीसाठी दरवाजा उघडा मग ती व्यक्ती स्त्री असो वा पुरूष, कारण कुणाला चांगली वागणूक दिल्याने तुमचा कमीपणा होत नाही.*


*6. तुम्ही मित्राबरोबर टॅक्सी शेअर केलीत आणि त्याचे भाडे त्याने दिले तर पुढच्या वेळेस आठवणीने तुम्ही भाडे द्या...हाच नियम पार्टीसाठीही आहे.*


*7. सगळ्या राजकीय मतांचा आदर करा.*


*8. कधीच कोणाच संभाषण मध्येच खंडीत करू नका.*


*9. जर तुम्ही कोणाची मस्करी करत असाल आणि त्या व्यक्तीला त्याचा त्रास होत असल्यास ती मस्करी ताबडतोब थांबवा.*


*10. जो मदत करतो त्याला धन्यवाद द्या.*


*11. एखाद्याची स्तुती सगळ्यांसमोर करा पण त्याचे दोष त्यालाच सांगा.*


*12. कोणाच्या वजनावर भाष्य कराण्याची काही आवश्यकता नसते. फक्त म्हणा तु छान दिसतोस किंवा दिसतेस , जर त्यांना वजन कमी करायचं असेल किंवा वाढवायचे असेल तर ते तुमच्याशी बोलतील.*


*13. जेव्हा एखादा त्याच्या मोबाईल मधील फोटो तुम्हाला दाखवतो तेव्हा डावीकडे किंवा उजवीकडे स्क्रोल करू नका , कारण तुम्हाला कल्पना नसते पुढे काय दिसेल.*


*14. जेव्हा आपला सहकारी डॉक्टरकडे जातो आहे असं म्हणाला तर,  कशासाठी? का ?असे प्रश्न विचारू नका, फक्त तु ठिक आहेस अशी आशा करतो एवढच म्हणा.त्याला सांगायचं असल्यास तो सांगेल , तुम्ही त्याला खाजगी स्वरुपाच्या आजाराबाबत विचारून खजील करू नका.*


*15. जेवढा मान साहेबाला द्याल तेवढाच शिपायाला पण द्या. आपल्या हाताखालच्या माणसांना तुम्ही कीतीही आदराची वागणूक देता यावर तुमच्या व्यक्तिमत्वाची उंची ठरवली जाते.*


*16. एखादा माणूस आपल्याशी समोरासमोर बोलत असल्यास सतत मोबाईल मध्ये लक्ष देणे ही अक्षम्य चूक ठरते.*


*17. जो पर्यंत सल्ला मागितला जात नाही तोपर्यंत देऊ नका.*


*18. जेव्हा एखाद्याशी बऱ्याच वर्षांनी भेटत असाल तेव्हा जोपर्यंत विषय निघत नाही तोपर्यंत त्याचे उत्पन्न व वय याबाबत विचारू नका.*


*19. जोपर्यंत एखाद्या विषयात तुम्हाला समाविष्ट केले जात नाही तोपर्यंत त्या विषयापासून लांब रहाणे योग्य.*


*20. रस्त्यात कोणाची भेट झाल्यास गॉगल काढून संभाषण सुरू करा , ह्यातून आदर प्रतित होतो तसेच साफ संभाषणाच्या दृष्टीने डोळ्यांचा संपर्क आवश्यक असतो.*

  

 *🙏🏻हा संदेश आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक आहे.*

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आयुष्य संपवण्याचे विचार मनात कसे येतात आणि ते कसे रोखावेत?

परीक्षेची अवास्तव भीती (एक्झाम फोबिया)

स्त्रियांची एनर्जी