संस्कार

 *वाकड्याना सोडून सरळ जे असतात त्यानाच ठोकले जाते"*

*【मग वाकड्या खिळ्याचे करायचे काय】*

*काल परवा एक संदेश व्हाट्सअप्प वर पाहिला!, एका लाकडी फळी वर ४/५ वाकडे खिळे होते, आणि एक सरळ खीळा होता. जो सरळ खीळा होता त्यावर हातोडीचा दणका मारताना दाखवले होते. आणि खाली लिहले होते*


" *वाकड्याना सोडून सरळ जे*असतात त्यानाच ठोकले जाते*"

*_मग वाकड्या खिळ्याचे करायचे काय.?_


*एक मजूर सहजतेने बोलला*

*"साहेब यांना पहिले जमिनीवर आणा मग हातोडीने हळू हळू सरळ करा,* 

*जोरात घाव घालू नका, ते तुटतील बिचारे* 

*एकदा सरळ झाले की मग त्यांना परत हळू हळू भिंतीत ठोका एकदा जर त्याचा वाकडा भाग भिंतीत गेला की मग हाच अर्धा ग्राम चा खिळा १० किलो वजन धरुन ठेवेल".*

परंतू 

*तसे न करता तुम्ही त्याची जबाबदारी दुसऱ्यावर सोपवता*

*त्याला खुशाल मोकळे सोडता ( फेकुन देता )*

बर 

*फेकल्यावर सुद्धा तो खिळा काय करतो*

तर

*चालती गाडी पंचर करणे*

*चालत्याच्या पायास रुतून जखम करणे*

*असे उपदव्याप करतो*


*त्या अशिक्षितने माझे डोळे उघडले*, 

*आणि कोणताच खिळा हा जन्मतः वाकडा नसतो, तो सुरुवातीला नीट ठोकला गेला नसल्याने (त्याच्यावर योग्य संस्कार न झाल्याने) तो वाकतो आणि जर आपण त्याला तसेच फेकून दिले तर त्या पासून* *चांगल्या चांगल्या गाड्या पंचर होऊ शकतात*. 

  *शेवटीं काय माणसांवर होणारे संस्कार सर्वात महत्वाचे असतात...* 

🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃

Comments

Popular posts from this blog

सिंहावलोकन

रफू

तलाठी भरती - अर्ज भरणेची प्रक्रिया सुरू