Posts

Showing posts from February, 2021

मराठी भाषा : व्यवसाय संधी आणि आव्हाने

     अलीकडील काळात भाषिक अस्मिता हा त्या त्या भाषिक समाजाचा जिव्हाळ्याचा विषय ठरू पाहात आहे. आणि त्यात अजिबात काही गैर नाही. भाषा म्हणजे एक संस्कृतीच असते. कोणतीही भाषा नष्ट होते तेव्हा संपूर्ण समाज त्या विशिष्ट भाषेपासून दुरावत असतो. या दृष्टिकोनातून भाषिक अवशेष टिकवून ठेवणे ही त्या त्या भाषिक समूहाची जबाबदारी ठरते.       मराठी भाषेच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे असे म्हणून गळा काढणारे काही कमी नाहीत. अशा गळेकाढू लोकांकडून प्रत्यक्षात मात्र भाषासंवर्धनाचे कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करून किंवा मराठी भाषा दिन साजरा करून मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार खरंच शक्य आहे का हा मोठाच प्रश्‍न आहे. त्यातून भाषावृद्धीसाठी प्रयत्न केल्याचे फसवे समाधान मिळू शकेल मात्र वास्तव बदलणार नाही. यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. डॉ. रमेश धोंगडे या भाषासंशोधकाच्या मते, भाषेचा तथाकथित विकास हा भाषेच्या प्रसारातून आणि मुख्यत: तिच्या वापरातूनच तपासता येतो. म्हणजेच दैनंदिन व्यवहारात ती भाषा किती प्रमाणात वापरली जाते यावरूनच...

संगीत क्षेत्रातील करिअर

  ☰ Do शिक्षण करिअर मार्गदर्शन क्रीडा व खेळ  नवी अनुभूती देणारे करिअर - संगीत क्षेत्र अवस्था: उघडा नवी अनुभूती देणारे करिअर - संगीत क्षेत्र शैक्षणिक पात्रता संगीत क्षेत्रात आवश्यक गुण कामाच्या संधी तसेच काय बनू शकता? प्रशिक्षण संस्था गंधर्व महाविद्यालय, दिल्ली गंधर्व महाविद्यालय मंडळ गंधर्व महाविद्यालय, पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, स्कूल ऑफ परफॉर्मिग आर्टस भारती विद्यापीठ, स्कूल ऑफ परफॉर्मिग आर्टस ना. दा. ठाकरसी महिला विद्यापीठ, संगीत विभाग एम.ए, इन म्युझिक नॅशनल सेंटर फॉर परफोर्मिंग आर्टस (एनसीपीए) मुंबई विद्यापीठ, संगीत विभाग अ‍ॅमिटी स्कूल ऑफ परफॉर्मिग आर्टस     संगीत मानवाच्या आयुष्यातील न वगळता येणारा घटक आहे. संगिताशिवाय माणसाचे आयुष्य निरर्थक होईल. सकाळची रम्य सुरुवात, दाटून आलेली कातरवेळ अशा प्रत्येक क्षणाला माणसाला संगिताची साथ सोबत मिळते. आणि त्या क्षणांना आनंददायी बनविते. भारतीय संगिताला मोठा समृद्ध वारसा लाभला आहे. पूर्वी केवळ मनोरंजन हाच संगिताचा उद्देश असायचा आता तो व्यापक झाला आहे. अनेक घराणी संगीत क्षेत्रात अजरामर झाली आहेत. संगीत भावनांची अभि...

दृष्टीकोन बदला आयुष्य बदलेल

   "मस्त आयुष्य जगण्याचा स्वस्त फंडा - एक मजेशीर गणित" पहा, सोडवा किंवा सोडून द्या पण आनंद जरूर घ्या. आपण असे मानू या की.... A, B, C, D, E, F, G, H, I, J, K, L, M, N, O, P, Q, R, S, T, U, V, W, X, Y, Z = अनुक्रमे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26. म्हणजेच A=1, B=2, C=3 असे मानले तर माणसाच्या कोणत्या गुणाला पूर्ण शंभर गुण मिळतात हे पाहू या.... आपण असे म्हणतो की, आयुष्यात "कठोर मेहनत/ HARDWORK" केले तरच आयुष्य यशस्वी होते. आपण "HARDWORK चे गुण पाहु या. H+A+R+D+W+O+R+K = 8+1+18+4+23+15+18+11 =98% आहेत पण पूर्ण नाहीत. दुसरा महत्त्वाचा गुण म्हणजे "ज्ञान" किंवा 'Knowledge'. याचे मार्क्स पाहु या K+N+O+W+L+E+D+G+E = 11+14+15+23+12+5+4+7+5=96% हे पहिल्या पेक्षा कमी. काही लोक म्हणतात "नशिब"/ LUCK हेच आवश्यक. तर लक चे गुण पाहु या. L+U+C+K = 12+21+3+11 = 47%,"नशिब" तर एकदमच काठावर पास. काहींना चांगले आयुष्य जगण्या साठी "पैसा/MONEY" सर्व श्रेष्ठ वाटतो. तर आता "M+...

मनव्यवस्थापन

     आहे त्याचा स्वीकार केल्यास नव्व्याण्णव टक्के चिंता पळून जातात. वेदनांना विचारांपासुन तोडलं की चिंता पळुन जाते! 1) भुतकाळात घुटमळणे बंद करा – बसल्या बसल्या ना, आपल्या डोक्यात उगाच चक्र सुरु असते, – “दहा वर्षांपुर्वी मी चांगला अभ्यास केला असता, तर आज मी ही खुप मोठ्ठा ऑफीसर राहीलो असतो.” – “सात वर्षांपुर्वी मी प्लॉट घ्यायला हवा होता, तेव्हा मी सुवर्णसंधी सोडली.” – “त्यावेळी मी त्यांच्याशी असे वागायला नको होते! खुप वाईट आहे मी!” – “मी खुप कमी पगारावर काम करायला तयार झालो, मी असे नव्हते करायला पाहीजे.” व्हायच्या त्या घटना घडुन गेल्या, टाईममशीनमध्ये जाऊन ते काही बदलता येणार नाही, तेव्हा आता त्यावर विचार करुन फक्त आणि फक्त, आपली बहुमुल्य उर्जा, फालतुमध्ये खर्च होणार, त्यापेक्षा *भुतकाळातल्या, ह्या सर्व चांगल्या वाईट घटना, विसरुन गेलेलं, बरं! 2) इथे प्रत्येक जण अद्वितीय आहे! – बहुतांश दुःखांच मुळ हे तुलनेत असतं, ह्या जगात प्रत्येक गोष्ट एकमेवअद्वितीय आहे, गुलाब दिसायला सुंदर असतो, पण म्हणुन मोगर्‍याचं महत्व कमी होत नाही, त्याचा सुगंध ही त्याची ओळख! त्या दोघात डावं-उजवं अशी त...

आनंदी जीवनासाठी

 निवांत वाचा. खरोखर छान वाटेल 🔴 कुणाच्या सांगण्यावरुन आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगले वा वाईट मत बनवण्यापेक्षा, आपण स्वतः चार पावले चालुन समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधुन मगच खात्री करा.  🔴 नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे ...बोलताना शब्दांची उंची वाढवा आवाजाची उंची नाही. कारण..पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते,विजांच्या कडकडाटामुळे नाही... 🔴वाहतो तो झरा असतो आणि थांबतं ते डबकं असतं..डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस!! निवड आपली आहे.." 🔴कुणा वाचून कुणाचे काहीच आडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. 🔴डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत,अन्...भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.  🔴जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणुन..! 🔴मोर नाचताना सुद्धा रडतो...आणि...राजहंस मरताना सुद्धा गातो...दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही...आणि  सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही.यालाच जीवन म्हणतात. 🔴किती दिवसाचे आयुष्य असते? आजचे अस्तित्व उद्या नसते,मग जगावे ते हसून-खेळून ...

प्रवास खूप छोटा आहे

                ------------------------------- *एक तरुण महिला एका बसमध्ये बसली होती.*  *पुढच्याच स्टॉपवर एक स्थूल आणि वयस्कर बाई आल्या आणि तिच्याजवळ बसल्या. जास्तित जास्त आसन तिने व्यापले आणि तिच्या सोबत तिने मोठाल्या पिशव्या पण आणल्या होत्या. त्यांनी पण खूप जागा व्यापली.*  🚌 *त्या तरुणीच्या दुसऱ्या बाजूस बसलेला तरुण अस्वस्थ झाला. तो त्या तरूणीला म्हणाला की "तू काहीच का बोलत नाहीस?"😴* *तरुणीने स्मित करून प्रतिसाद दिला* 👉🏼 *"अनावश्यक किंवा बाष्फळ काहीतरी बोलण्यात काहीच अर्थ नाही.  आपला एकत्र प्रवास खूपच छोटा आहे. मी पुढच्याच स्टॉपवर उतरणार आहे."* *👉🏼ही प्रतिक्रिया* *सुवर्ण अक्षरांमध्ये लिहिली जाण्यासाठी पात्र आहे.* *👉"इतक्या नगण्य गोष्टींवर भांडण करणे आवश्यक नाही, आपला प्रवास खूपच छोटा आहे"*  *⭕आपल्यापैकी प्रत्येकाने हे जाणले पाहिजे की, हा तर काही मिनीटांचाच प्रवास आहे , तसेच जीवन हा सुद्धा एक काही काळापुरता प्रवासच आहे.* *मानवाचे आयुष्य मर्यादित आहे. आपल्याला इथे वेळ  इतका कमी आहे;* *की त्या वेळात भांडणे, निरर...

उत्तम मानसिक आरोग्यासाठी

      आपले मानसिक आरोग्य उत्तम ठेवायचे असेल तर हा लेख अवश्य वाचा..        रवंथ हे फक्त गाई गुरेच नाहीत करत तर त्यांच्याहूनही अधिक माणसांना रवंथ करायची सवय लागली आहे.थोडे तुम्हाला आश्चर्यही वाटेल माणसं कसलं रवंथ करतात. मला इथे पान, तंबाखू किंवा गुटखा खाऊन केलेल्या रवंथा बद्दल बोलायचेच नाही.आता या पेक्षा हि वेगळे रवंथ कोणते ते सांगते .      मी संध्याकाळी शाळेतून घरी आले होते डोके जाम झालेले अगदी ठणकत होते.मी यांना म्हटलं माझे डोके खूप दुखते आहे.त्यांनी लगेच मला पुढचा प्रश्न विचारला काय झाले शाळेत आज?अर्थातच, मी याच गोष्टीची वाट पाहत असावे.मी पटकन शाळेत झालेला मनस्ताप इतिवृत्ता सह यांना सांगितला.वाटले आता तरी जरा आराम वाटेल डोक्याला. पण शक्य नव्हते.जरा वेळाने आईचा फोन आला व आईने हि पटकन ओळखले की हिचे कांही तरी बिघडले आहे. त्यावर पुन्हा मी तिलाही घडला प्रसंग इतिवृत्तासह सांगितला. व अशा पुन्हा पुन्हा त्या विषयाची चर्चा व त्यातून पुनरावृत्ती होत गेल्यामुळे माझा त्रास वाढत गेला यांनी स्पष्टपणे सांगितले हि," अगं किती हा विषय चघळत बसणार आहेस" ..त...